" A High Flying Adventure "

पराक्रमाची साक्ष-रामशेज किल्ला imageपराक्रमाची साक्ष-रामशेज किल्ला imageपराक्रमाची साक्ष-रामशेज किल्ला image
साडे पाच वर्षे निकराची झुंज देणारा रामशेज अशा किल्ल्यांची ही भटकंती .........

टी एल पी ट्रेकिंग ग्रुप च्या माध्यमातून आम्ही ब्राह्गिरी आणि दुर्ग भांडार किल्ला सर करून आल्यावर नवीन वर्षाच्या दुसर्या आठवड्यात १५ जानेवारी २०१९ ला अजून एक कुठलाही किल्यावर ट्रेकिंग करायचा बेत आखला. पण त्या दिवशी संक्रात असल्याने येणार्याची संख्या कमी होती आणि घरच्यानाही वेळ देता यावा मानून नाशिक पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या किल्ले रामशेज आम्ही पसंती दिली. सात जण आम्ही सकाळी ६.३० वाजेला नाशिक हून रामशेज ला निघालो.

किल्ले रामशेज : नाशिक-पेठ रस्त्यावर पंचवटीपासून १० किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्‍यांच्‍या कारकिर्दीत हा किल्‍ला सतत साडेपाच वर्षे (पासष्‍ट महिने) मोगलांशी झुंजत ठेवला.मराठा साम्राज्यातील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या द-याखो-यात व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. किल्ला खूप उंचीवर नाही. दिसायला तसा छोटेखानी, अगदी एखाद्या टेकाडाएव्हढाच. पण त्याला संरक्षण आहे ते चहुबाजुंनी असलेल्या कातळकड्याचे. हा किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे याच भक्कम नैसर्गिक तटबंदीच्या जोरावर आणि यावरच्या मूठभर मावळ्यांच्या मनगटाच्या ताकदीवर हा किल्ला मोगलांच्या राक्षसी सैन्यबळापुढे तब्बल साडेपाच वर्षे झुंजला. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे, म्हणून या डोंगराला रामशेज म्हटले जाते, अशी अख्यायिका आहे.

किल्ला नाशिक जवळ असल्याने ३० मिनिटात आम्ही किल्याच्या पायथ्याच्या आशेवाडीत गावात पोहोचलो तिथून रामशेजची कातळटोपी लक्ष्य वेधून घेत होती. तिथे कार पार्क करून आम्ही किल्याकडे मार्गस्थ झालो. जानेवारी आणि त्यात सकाळची थंडी मोकळ्या जागेवर बर्यापैकी जाणवत होती.पायवाटेने हळू हळू आम्ही वर चढायला सुरवात केली. पुढे उजवीकडे दरी आणि डावीकडे किल्ला यांमधून अरूंद अशी ती वाट होती.रामशेजचे वैशिष्ट्य असे की, तो कोणत्याही बाजूने सहज चढता येतो अन्‌ तोही अगदी तासाभरात म्हणून भरपूर जण सुुटीच्या दिवशी इथे परिवारासोबत फिरायला येणे पसंत करतात. थोड्याच वेळात पुढे बांधीव पायर्‍या लागल्यात. पायर्‍या चढून जातच आम्ही थेट गडाच्या कातळाला भिडलो. गडाचा मूळ दरवाजा तिथेच कातळात बुजलेल्या अवस्थेत आहे.कातळात एक गुहा खोदलेली दिसते. गुहेत रामाचे मंदिर आहे व शेजारीच पाण्याचे टाके आहे.तिथून अजून काही पायर्‍या चढून गेल्यावर आम्ही गडमाथ्यावर आलो. इथे हवेचा जोर इतका जास्त होता कि चालणेही मुश्कील होत होते. आम्ही गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन परत दरवाजापाशी येऊन समोरच्या पठारावर गेलो. इथे बर्‍यापैकी सपाटी असून काही अवशेष, ओहोरलेले पाण्याचे टाके व ध्वजस्तंभ आहे.दोन तासात पूर्ण गडाचा फेरफटका मारून आम्ही उतरणीला लागलो. २० ते २५ मिनिटातच परत पायथ्याला पोहोचलो. सकाळचे ९:३० वाजत आले होते आणि सकाळी नाश्ता केल्या नसल्याने सगळ्यांना भूकही लागली होती म्हणून पंचवटीच्या फेमस अंबिकाची काळी मसाल्याची मिसळ वर ताव मारून आम्ही घरी निघालो.

-दिनेश पाटील




I BUILT MY SITE FOR FREE USING